"सम्राट अशोकचे नऊ" हे प्रकरण खरोखर अस्तित्वात होते की काल्पनिक आहे? कारण भारत सरकार आणि चीन सरकारने या बाबत मौन धारण केले आहे?
एखादी योजना शेकडो वर्षे इतक्या गुप्तपणे अस्तित्वात राहील, सक्रीय राहील हे अगदीच अशक्य नाही असं मला प्रांजळपणे वाटतं.
तसं भारतिय संस्कृतिमध्ये अनेक शक्तिस्थळं होती, त्यात एक गुरूकूल शिक्षण पद्धती, पण गुरुकूल पद्धती ही गुप्त नव्हती त्यामुळे त्यावर अनेक वर्ष परकीय आक्रमणं होत राहिली, आणि इंग्रजांनी ती निर्णायकरित्या संपवून पाश्चात्य शिक्षणपद्धती आपल्यावर लादली. अन्यथा प्रत्येक आक्रमणानंतरही मौखिक ज्ञानपद्धतीमुळे त्या गुरूकुलांचे पुनरुत्थान होत राहिले आणि शेकडो वर्षे विद्यापिठे अस्तित्वात राहिली.
तसेच सम्राट अशोकचे 9 हे जर गुप्तपणे कार्यरत राहिल्यामुळे आक्रमणांना बळी पडले नसावेत व अद्याप अबाधित असावेत.
आता इतक्या उत्तम यंत्रणेवर भाष्य करून त्यांचे अस्तित्व धोक्यात आणण्यापेक्षा कोणत्याही देशाने त्याची चर्चा टाळणेच जास्त आवश्यक आहे.
(सम्राट अशोकचे 9 हे आहेतच असा माझा कोणताही दावा नाही, मी केवळ शक्यता मान्य करतोय)
Comments
Post a Comment